Sunday, June 23, 2013

वासरू

- आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल) (१९०१ - १९८२)


ओढाळ वासरू रानी आले फिरू
कळपाचा घेरू सोडुनिया

कानांमध्ये वारे भरुनिया न्यारे
फेर धरी फिरे रानोमाळ

मोकाट मोकाट, अफाट अफाट
वाटेल ती वात धावू लागे

विसरुनी भान भूक नि तहान
पायांखाली रान घाली सारे

थकुनिया खूप सरता हुरूप
आठवे कळप तयालागी

फिरू जाता मागे दूर जाऊ लागे
आणखीच भागे भटकत

पडता अंधारू लागले हंबरू
माय! तू लेकरू शोधू येई. 

No comments:

Post a Comment

A Homeless Night